चंद्रपुर :- गेल्यावर्षी आणि यावर्षी कोरोनामुळे लागलेल्या टाळेबंदीने जवळपास १४ महिन्यात संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईस आणली. राष्ट्रीय स्तरावर फार मोठे नुकसान झाले. लहानमोठे हजारो उद्योग बंद पडले. मोठे उद्योग सावरत असले तरी लहान उद्योगांना जबर फटका बसला. वेकोलि, पॉवर प्लांट, सिमेंट उद्योग तसेच पेपर मीलमधील कामगारांना ५० ते ७५ टक्के रोजी मिळाली. पण स्थलांतरीत आणि अस्थायी कामगारांना प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या. छोटे कारखाने बंद पडले. त्यामुळे पगार नाही. जवळपास ३० टक्के कामगारांचा रोजगार टाळेबंदीत हिरावला गेला, असे स्पष्ट मत काँग्रेसचे माजी खासदार तथा ज्येष्ठ कामगार नेते नरेश पुगलिया यांनी व्यक्त केले आहेत, स्थलांतरीत आणि अस्थायी कामगार हा समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याला वान्यावर सोडून चालणार नाही. ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. पण केंद्र किंवा राज्य सरकारकडून या कामगारांना मदत मिळाली नाही, असा आरोप करीत नरेश पुगलिया यांनी, टाळेबंदीत बंद पडलेल्या लहान उद्योगांना कर्जाच्या व्याजात आणि पॉवरमध्ये सब्सीडी मिळणे आवश्यक आहे. अलिकडे अनेक ठिकाणी ७० टक्के ठेकेदारी पद्धत सुरू झाली आहे. राज्यातील जवळपास सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्या लयांमध्ये कंत्राटी पद्धतीने डॉक्टर्स, लेक्चरर्स तसेच इतर कर्मचाऱ्यां च्या नियुक्त्या केल्या जातात. कोरोनाच्या काळात राज्यात दीड हजाराच्या वर कंत्राटी कामगारांना जीव गमवावा लागला. वैद्यकीय सेवेत कायमस्वरुपी कर्मचारी नियुक्त केल्याशिवाय संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपवणे शक्य नसल्याचे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले. कोरोनाकाळात मृत्यूमुखी पडलेल्या कायमसेवेतील कामगाराला १५ लाख रुपये आणि कंत्राटी सेवेतील कामगाराला त्याची सेवा पाहून १ ते ५ लाख रुपयापर्यंत मदत • करण्याचा पहिला निर्णय एसीसी सिमेंट कंपनीने घेतला. त्यामुळे हे उद्योग आता शहरात आले. १ आणि २ रुपये फुट किंमतीची जमीन १८०० ते २००० रुपये झाली. त्यामुळे उद्योग चालविण्यापेक्षा जमीन विकण्यात उद्योजकांचा अधिक इन्ट्रेस असल्याचा आरोपही नरेश पुगलिया यांनी केला आहे.

Related videos
कळमना येथे कापसाचे 3 लक्ष 94 हजार 470 रुपयांचे – अनधिकृत बियाणे जप्त – तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पथकाची कारवाई
बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे बोगस बीटी कापसाचे अंदाजित रक्कम 3 लक्ष 94 हजार 470 रुपयांचे अनधिकृत बियाणे तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांच्या...
वीज पडून आई व दोन मुलींचा जागीच मृत्यू, वरवट येथील घटना
वीज पडून आई व दोन मुलींचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज मंगळवारी दुपारचा सुमारास चंद्रपूर शहरालगत असलेल्या वरवट या गावात घडली....
ग्रामीण भागातील थकित विजबिलापोटी पथदिव्यांचे विज कनेक्शन कापण्याची मोहीम त्वरीत थांबवावी अन्यथा आंदोलन करू – आमदार सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर जिल्हयात अनेक ग्राम पंचायत क्षेत्रात पथदिव्यांचे विज कनेक्शन थकित विजबिलापोटी खंडीत केले जात आहेत. हा जिल्हा विज उत्पादक जिल्हा आहे. अनेक...
शेतकरी आत्महत्येची 23 प्रकरणे मदतीकरीता निकाली – अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी घेतला आढावा
जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीच्या बैठकीमध्ये शेतकरी आत्महत्येच्या एकूण 27 प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात...
Related videos
चंद्रपूर जिल्ह्यात दहावीच्या निकाल ९५.९७ टक्के – बल्लारपूर अव्वल, तर जिवती तालुका सर्वांत कमी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी...
25 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
प्रशांत गेडाम - प्रतिनिधी
25 वर्षीय युवकाने झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही पवनपार...
चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात कारागृहातील 540 महिला व पुरुष कैद्यांची तपासणी
चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालय व टाटा कॅन्सर केअर प्रोग्राम चंद्रपूरतर्फे विशेष कर्करोग जनजागृती कार्यक्रम व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
म्हसाळा,नवेगाव वेकोलि परिसरातील ‘तो’ वाघ वयोवृद्ध – ट्रॅप कॅमेरा, रॅपिड रिस्पॉन्स युनिट टीम व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे वाघावर लक्ष
दुर्गापूर कोळसा खाणीलगत चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील दुर्गापुर उपक्षेत्र, दुर्गापुर नियत क्षेत्रातील म्हसाळा नवेगाव परिसरातील वेकोलिचे ओव्हरबर्डन भागात वाघ बसलेला असल्याबाबत दि. 7 मे...